प्रत्येकाच्या मनात खरच एक गोड शाळा लागलेली असते. फक्त इमारतच नव्हे तर तिथली मित्र, मनातल्या मनात मानलेल्या 'मैत्रिणी', आवडते शिक्षक, शिक्षिका वगैरे वगैरे ने आपली ही मनातली शाळा गच्च भरलेली असते. हाच संदेश शाळा हा चित्रपट देऊन जातो. अगदी प्रत्येक आठवण जागी करतो. चित्रपटाने सगळे बारकावे पकडले आहेत. त्यातली त्यात चिमुकल्यांची प्रेम कहाणी जिचा खरच खऱ्या आयुष्यात (म्हणजे वयाने मोठ्या झालेल्यांच्या भाषेत) फार काही सिग्नीफिकंस नसतो, ती तर इतकी छान चीत्रतीत केलेली आहेत की ज्यांना कधी शाळेतल्या चिमुकल्या प्रेमाची जाणीव झालेली नसेल त्यांना ही जाणवेल की अरे आपण तर त्या मनातल्या 'शिरोडकर' च्या प्रेमात होतो. मनातली शिरोडकर. व्वा. तुम्हाला त्या सगळ्या आठवणी जाग्या करायच्या असतील तर नक्की पहा आणि मनातली शाळा पुन्हा एकदा लावा.
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तसं ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, त्याचा हा आधुनिक जन्म दिवस. महाराष्ट्र कधी पासून अस्तित्वात असेल? म्हणजे इथली संस्कृती, आपण जे वागतो, जगतो, बोलतो, राहतो वगैरे वगैरे. कधी पासून हे सगळं असं असावं? याचं उत्तर आपल्या सारख्या सामान्यांपेक्षा हा ज्या कोणत्या विषयाचा विषय असेल त्या विषयाच्या निष्णातांना जास्त चांगलं माहित असेल. तरी, आपला एक सामान्य माणूस म्हणून या भूमीवर अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आपण आपला एक अंदाज लावू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर-नामदेव इथे आपल्याला या मराठी राज्याची - महाराष्ट्राची - सुरुवात झाली असावी, असा अंदाज लावता येईल.म्हणजे आजच्या आपल्या मराठी म्हणता येईल अशा संस्कृतीची सुरवात तिथून झाली असं आपण समजू शकतो. किंवा मला जे मांडायचं त्या साठी ते सोयीचं आहे म्हणून समजा हवं तर! पण मीच कशाला वारकरी साहित्यातच संत बहिणाबाईंनी लिहून ठेवलयं - संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥ ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥ नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥ जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥ तुका झालासे कळस । भजन करा ...
Comments